Home » Land Mafiya : जागा बळकविणाऱ्यांना वेळीच चाप लावा

Land Mafiya : जागा बळकविणाऱ्यांना वेळीच चाप लावा

Akola : कवडीमोल किमतीत इतर जागा विकत घेण्याचा सपाटा

by नवस्वराज
0 comment

जयंत इंगळे | Jayant Ingle

एका विशिष्ट समाजाकडून मुलींना फूस लावण्याप्रमाणेच त्याच समाजाकडून लोकांच्या जागा बळकविणे हा देखील चिंतेचा विषय आहे. अनेक चांगल्या भागातील मोक्यावरील प्लाॅट, घरे, फ्लॅट तसेच शेतजमीनी या समाजाचे लोक अव्वाच्यासव्वा भाव देऊन विकत घेत आहेत. यामागील त्यांचे धोरण दूरदृष्टी ठेवून आखलेले आहे. चांगल्या भागात जास्त किंमत देऊन प्रवेश झाला कि, आजूबाजूच्या जमिनीची किंमत आपोआप पडते मग हे लोक कवडीमोल किमतीत इतर जागा विकत घेतात. एका जागेच्या बदल्यात बाकीच्या जमिनी जवळपास मोफत मिळतील याची त्यांना खात्री असते. ते सिंडिकेट बनवून जागा खरेदी करतात. यामागील उद्देश हा की ‘एकमेका साह्य कर, अवघे बनू मालक आणि श्रीमंत’.

हिंदूंच्या जागा विकल्या जाण्याची कारणे अनेक आहेत. परंतु महत्त्वाची कारणे म्हणजे, कुठलेही कष्ट न करता मिळालेली संपत्ती, मुलांचा नाकर्तेपणा आणि अनास्था. पैतृक संपत्तीचा फक्त उपभोग घेणारे आणि त्याची कुठल्याही पद्धतीने विल्हेवाट लावून पैसे बनवणारे वारस तसेच पारिवारीक कलह. प्लाॅट, घर , फ्लॅट, शेतजमिनी खरेदी मागील आपल्या लोकांचा उद्देश प्रसार करण्याचा नसून केवळ उपभोग घेणे हा असतो. आपली व्यवसायिक प्रवृत्ती आणि जिद्द देखील वाढ करण्याची नसल्यामुळे आपण धंद्यातही गटांगळ्या खातो. अर्थात याला काही बोटावर मोजण्याइतके अपवाद देखील आहेत.

हिंदूंनी वरील गोष्टींवर चिंतन करूनच आपली अचल संपत्ती विकण्याचा निर्णय घ्यावा. कुठलीही कारणामुळे आज आपण ज्या भूतांना आपल्या जमिनी विकतो आहे, ते आपण जगाच्या कुठल्या ही कोपऱ्यात गेलो तरी आपल्या मानगुटीवर आज ना उद्या बसणार हे नक्की. त्यामुळे आपल्याला धोका नाही या भ्रमात कोणीही राहू नये.

हिंदूंनी आपल्या अचल संपत्तीची विक्री करताना शक्यतो मध्यस्थी टाळून प्रत्यक्ष व्यवहार करावा. हिंदूंनी, हिंदूंच्या संपत्तीचे भाव पाडून मागणी करू नये. पारिवारीक व शेजाऱ्यांशी असलेले मतभेद व हेवेदाव्यापोटी चुकीच्या व्यक्तीला संपत्तीची विक्री करू नये. शक्य असल्यास स्वतः वा परिवारातील सदस्यांच्या सहकाऱ्याने जागा डेव्हलप करावी. भावनेच्या भरात घेतलेल्या निर्णयाचा त्रास भावी पिढ्यांना होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. कारण आपण मेल्यानंतर जग बुडेनाका असा संकुचित विचार योग्य नाही.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!