Home » आमदारांची किंवा त्यांच्या घराची सुरक्षा काढली नाही : गृहमंत्री

आमदारांची किंवा त्यांच्या घराची सुरक्षा काढली नाही : गृहमंत्री

by नवस्वराज
0 comment

मुंबई : मुंबई पोलिसांकडून कोणत्याही आमदाराची किंवा त्यांच्या घराची सुरक्षा काढण्यात आली नसल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले. बंडखोर आमदारांच्या घराची सुरक्षा महाराष्ट्र पोलिसांकडून काढण्यात आली असल्याचा आरोप बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी केला. मात्र गृहमंत्री पाटील यांनी या आरोपांचे खंडन केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदारांना परतण्यासाठी 24 तासांचा अल्टिमेटम दिला होता. त्यानंतरही एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील आमदार परत न आल्याने मुख्यमंत्र्यांनी देखील कारवाईचा इशारा दिला. अशांत उद्धव ठाकरे यांच्या भावनिक भाषणानंतर शिवसैनिक आक्रमक झाले. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, पंढरपूर येथे आमदारांच्या कार्यालयावर शिवसैनिकांकडून तोडफोड करण्यात आली आहे. परिणामी मुंबईत जमावबंदी लागू करण्यात आली. मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातील शिवसैनिक जरी आक्रमक असले तरी विदर्भात मात्र कार्यकर्ते शांत आहेत.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!