Home » Yavatmal Crime : कळंब चौक येथे गोळ्या घालून युवकाची हत्या

Yavatmal Crime : कळंब चौक येथे गोळ्या घालून युवकाची हत्या

Sand Mafiya : दुचाकीचा धक्का लागल्यावरून वाद

by नवस्वराज
0 comment

Kalamb Square :  दुचाकीचा धक्का लागल्याच्या वादातून युवकाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. ही घटना मंगळवारी रात्री 10: 45 वाजता घडली. या घटनेने यवतमाळ शहरात खळबळ उडाली आहे. शादाब खान रफिक खान रा. तायडे नगर यवतमाळ असे मृताचे नाव आहे. त्याच्यावर अंबिका नगर पातीपुरा येथील चौघांनी गोळीबार केला. यात एक गोळी थेट छातीत लागल्याने शादाबचा मृत्यू झाला.

शादाबचा मनीष शेंदरे याच्या दुचाकीला धक्का लागला. यावेळी मनीष सोबत एक युवती देखील होती. शादाबच्या मित्राने युवती बाबत अपशब्द काढल्याने मनीष आणि त्याचे मित्र संतापले. त्यानंतर मनीष हा त्याच्या तीन मित्रांसह आला. शादाब सोबत त्यांचा वाद झाला. वादानंतर आरोपींनी गोळीबार केला, त्यानंतर लगेच घटना स्थळावरून पळ काढला. घटनास्थळ परिसरात आरोपीची असलेली दुचाकी जाळण्यात आली. घटनेची माहिती मिळताच कळंब चौक येथे मोठा जमाव जमला होता. पोलिस अधीक्षक डॉ. पवन बनसोड घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!